शुक्रवार, ५ जून, २००९

माझी प्रिये.....

२००८ नोव्हेंबर मधल्या एका दिवशी मी ऑफिस मधून रात्रपाळी संपवून घरी येत होतो. माझ्या स्टेशन मध्ये उतरल्यावर पहिला तर तिचे काही sms आले होते. आत्ता नक्की नाही आठवत पण त्यातल्या एकाचा आशय 'तू आल्या पासून माझे जीवन फुलून आले आहे...' इ. असा होता. अत्ता माझ्या सारख्या मुलाला ज्याला तोपर्येंत एकाही मुलीने कधी साधे ढुंकूनही पहिले नाही (कसे कळणार कारण मीही तेव्हडं काही लक्ष नाही द्यायचोना) त्याला जर का असा sms आला तर तो हरखून नाहीका जाणार? माझे हि तेच झाले.

साधारणत दीड महिन्या आधी तिची आणि माझी कामानिमित्ताने ओळख झाली होती. माझ्या कंपनीने ज्या कंपनीला काही काम outsource (ह्याचा मराठी शब्द माहित नाही. क्षमा असावी) केले होते त्याच कंपनीत ती काम करत होती. लहानपणापासून कोणतीही मैत्रीण नसल्याकारणे मिलींशी कसे बोलावे व जवळीक वाढवावी माहित नव्हते, आणि जेव्हा माझाच कलीग ती व इतर काही मुलींशी तासंतास chat करायचा तेव्हा जीव जाळायचा 'कि साला हा एव्हडं काय बोलतो कि ह्या मुली इतक्या ह्याच्याशी बोलतात?'

त्यानंतर एक-दोनदा तिनेच मला chat वर Hi केलं तेव्हा मीही जेवढ्यास तेव्हडे बोललो. पुढे जेव्हा-केव्हा आमची शिफ्ट एकत्र यायची तेव्हा आम्ही chat करू लागलो. बहुतेकवेळा एखाददुसर्या विषयावर चर्चा हि होऊ लागली. हळू हळू मला तिचा online का होईना सहवास आवडू लागला (मी मुंबईत व ती दुसरीकडे असल्या कारणे). मी तिच्या शिफ्टचा track ठेवू लागलो आणि जर का मला सुट्टी असणार तर मी घरून तिच्याशी chat करू लागलो.

काही दिवसांनी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी पहिल्यांदा मी तिच्या सोबत बोलण्यासाठी तिचा mobile # घेतला व आम्ही काही sms केले. नंतर हळूहळू sms पासून आमची पायरी call करण्यापर्येंत चढली व सुरवातीला काही मिनिटांपासून ते नंतर एक-दोन तासापार्येंत चालू लागे. ह्याच्या आधी व आत्ताही मला खरच नवल वाटते काय बरं म्हणतात हे प्रेमी एवढ्यावेळ (पण खरच सांगू त्यावेळी मला तिचा mobile वर का होईना सहवास हवाहवासा वाटत होता त्यामुळे हे न ते विषय अपोआप सुचायचे).
काही दिवसांनी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी पहिल्यांदा मी तिच्या सोबत बोलण्यासाठी तिचा mobile # घेतला व आम्ही काही sms केले. नंतर हळूहळू sms पासून आमची पायरी call करण्यापर्येंत चढली व सुरवातीला काही मिनिटांपासून ते नंतर एक-दोन तासापार्येंत चालू लागे. ह्याच्या आधी व आत्ताही मला खरच नवल वाटते काय बरं म्हणतात हे प्रेमी एवढ्यावेळ (पण खरच सांगू त्यावेळी मला तिचा mobile वर का होईना सहवास हवाहवासा वाटत होता त्यामुळे हे न ते विषय अपोआप सुचायचे). आम्ही एवढ्या विविध विषयांवर चर्चा केली कि आत्ता मलाहि नवल वाटतं त्याचं. आतंकवाद, स्त्रीह्क्क, पुरुषप्रधान संस्कृती ते चक्क नवरा बायकोने कसे वागावे इ. विषयांवर आम्ही चर्चा करीत असे.

कालांतराने (म्हणजे फक्त १ ते सवा महिन्यात) तो सुरवातीला सांगितलेला तिचा sms आला होता. (माझी अवस्था तर एखाद्या १ नंबर येणाऱ्या मुलाची result च्या दिवशी असते तशी झाली होती, म्हणजे नक्कीच तोच पहिला येणार ह्याची शाश्वती नसते तेव्हाची.) पण ती स्वतः असे मला काही बोलली नव्हती (सगळ्या मुली अश्याच असतात वाटतं, फक्त संकेत द्यायचे आणि आपण विचारल्यावर 'मी असे कधी बोलले' असे म्हणायचे. असो!).

मग न राहवून मीच तिला २ दिवसांनी घाबरत-घाबरत विचारले (कारण भीती होती कि कुठे असलेली मैत्रीही तुटू नये). तेव्हा ती 'हो' म्हणाली. माझा मलाच विश्वास बसत नव्हता. माझ्यासाठी तर सगळीकडे आनंदी-आनंद झाले होते. एवढा आनंद तर मला डिप्लोमा पास झाल्यानंतरहि झाला नव्हता. मग call मध्ये आम्ही एकमेकांच्या घरच्यांबद्दल माहिती सांगितली. पुढे-पुढे आमच्या बोलण्यात मी अधिकच काळजी घायचो कि कुठे तिला वाईट वाटू नये.

असेच काही अविस्मरणीय दिवस गेले. एके दिवशी तिची night शिफ्ट होती तेव्हा मी तिला call केला तर तिने उचलला नाही. मला वाटले कि असेल काही असेच कारण, मग तिचा sms आला कि ती येणाऱ्या cab चा driver चांगला नसल्या कारणाने तिने call उचलला नाही. नंतर मग एक-दोन दिवस झाले तरी तिचा call आला नाही म्हणून मीच call केला तर तिने कट केला, मला वाटले कि बिझी असेल नंतर call करेल. नंतर तिचा sms आला कि ती कोणत्यातरी tension मध्ये आहे आणि म्हणून तिला काही दिवसांसाठी एकांत हवा आहे. मी तिला म्हटलं कि काही मदत हवी असेल तर मी आहेच.

असाच एक दीड आठवडा गेला असेल. मी परत call करून पहिला तर फोन उचलला नाही वाटलं नंतर करेल पण तिचा call आला नाही. मग ठरवलं कि आपणहून मी तिला call नाही करणार. कारण जेव्हा जेव्हा त्या काही दिवसात जेव्हा जेव्हा मी तिला call केला होता तेव्हा एक तर ती call उचलायची नाही किंवा कट करायची त्यामुळे मला माझा अपमान झाल्यासारखे वाटायचे (अजूनही वाटते).

पुढे पुढे मी तिच्याशी संभाषण कमी करू लागलो आणि तेहि जरका तिचा call आला तरच.

नंतर एकदा ती म्हणाली होती कि तिला वाटत होतं कि आमचं प्रेम (?) प्रकरण पुढे जाऊ शकलं नसता म्हणून ती माझ्याशी दुरावा ठेवू लागली.

आज आम्ही केव्हातरी बोलतो (email द्वारे) तेही जेवढ्यास तेवढे. आम्ही एकमेकांना एकदाही भेटलो नाही. मला माहित नाही कि खरच तिचं माझ्यावर प्रेम होतं का, कि नुसतं खेळत होती माझ्या सोबत.

आम्ही भेटलो असतो तरी हे असाच संपलं असतं ?

माझ्या मनात अजूनही तिच्या बद्दल ओढ आहे. मी जे काही प्रेमाचे क्षण अनुभवले आहेत ते तिच्यामुळे.

आपला मित्र....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा